‘मराठवाडा १९४८ : मुक्तिसंग्रामाचा समकालीन शोध’ - इतिहासाचा अभ्यास करताना, वर्तमानाची चिकित्सा करत, भविष्याचा वेध घेणारे पुस्तक
हैद्राबाद मुक्तिसंग्राम म्हणजे या भूभागाला केवळ भारताशी जोडणे नव्हते. केवळ लष्करी करून थांबता येणार नव्हते. मुत्सदीपणे हा प्रश्न हाताळणे गरजेचे होते. निजाम मीर उस्मान अली यांचे ५ ऑक्टोबर १९४८चे फर्मान व आकाशवाणीवरचे भाषण हे भारताच्या कूटनीतीचे मूल्यात्मक यश असल्याचे लेखक अभ्यासाअंती विवेचन करतात, तेव्हा या लढ्याची आणि लढ्यामागची आणि लढ्यानंतरची यशोगाथा कळते.......